Thursday, 3 November 2016

एकटेपण जपून ठेवावे 
सुरेख कवितेच्या ओळीसारखे 
तटस्थ रहावे योगी व्हावे 
चिडचिड तडफड दूर करावी 

आपल्यातुनच बाहेर राहून आपल्याला 
अन इतरांना बघत रहावे 
क्षण वाहणारच वाहू द्यावे 
ओंजळीत त्यांचे निष्कर्ष धरावेत 

सुख आनंद लालसा आणि 
वेदना दुक्ख क्रोध अन आत्मक्लेश 
जमेल तेवढे वेगळे करावे 

आपले असे काय असते अन का असावे 
याचा नीट विचार करावा 
आयुष्याचे चिवट धागे स्वतःभोवती 
गुफुन घ्यावे 

सोबत असेल सोबत नसेल 
आठवणी मात्र कायम असतील 
अनेकदा कड्यावरून कोसळताना 
त्यांचा मात्र आठव करावा 

एकटेपण जपून ठेवावे 
सुरेख कवितेच्या ओळीसारखे 
होता होता त्यामधून सुरेल गीत स्फुरत जावे  …
आपल्या मनाचे हसू हलकेच आपल्यावरती पसरत जावे …। 

हरीश 
  


No comments:

Post a Comment