एखादा चकाकता क्षण उगवतो
की आयुष्य हिऱ्यासारख किमती होऊन जातो
एखादा असाही मलिन क्षण येतो की
सगळ काही माती माती होऊन जात
अन त्या मधल्या काटेकोर मर्यादशील
संकुचित अशा आनंद लोभ हेवा लालसा
क्रौर्य मतलबीपणा अशा भावनांमध्ये कडेलोट न होऊ
देता सपक जगत रहातो आपण
कोणता प्रमाद होऊ नये
कोणी बोट रोखू नये
कोणी वाळीत टाकू नये
कोणी टोचून बोलू नये
या कातडीबचावू लाम्बकाला लोम्बकळून
जगात असतो आपण
कमवायचं तर खूप असत
पण गमवायची काही इच्छा नसते
विझून जातात हृदयात धुमसणारे भाकड वणवे
अन उध्वस्त होत असतात मनात असेलेली संस्कारित कुंपणे
तरी तिथेच कोपऱ्यात उभे आपण नेस्तनाबूत सैनिकासारखे
शस्त्रहीन कणाहीन शिणलेले कुचम्ब्लेले घनदाट
हळवे आनंद पराजित होत असतात
अन सरळ साध कधी जिंकत नसत
या वेदनेसह
हरीश
No comments:
Post a Comment