Thursday, 3 November 2016

सखीच्या बांगड्या वाजता 
संध्या सावळी होता 
मन अधीर होताना 
रानात आर्त पावा 

पुस्तकी  पिंपळपान जाळीचे 
सुकलेली चार फुले 
कविता युगायुगांची 
जणू ओघळलेले अश्रू 

मनात दडला मोर 
त्याचा पिसारा फुलेना 
भरल्या गोकुळात कधी 
असे कोण एकटा 

क्षण चालला पुढे 
अन मन ओढते मागे 
दूर राहिले मैत्र अन सगेसोयरे 
अन चौकट उभी मध्ये 

हरीश 

No comments:

Post a Comment