सखीच्या बांगड्या वाजता
संध्या सावळी होता
मन अधीर होताना
रानात आर्त पावा
पुस्तकी पिंपळपान जाळीचे
सुकलेली चार फुले
कविता युगायुगांची
जणू ओघळलेले अश्रू
मनात दडला मोर
त्याचा पिसारा फुलेना
भरल्या गोकुळात कधी
असे कोण एकटा
क्षण चालला पुढे
अन मन ओढते मागे
दूर राहिले मैत्र अन सगेसोयरे
अन चौकट उभी मध्ये
हरीश
No comments:
Post a Comment